दिवा :- तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहर हा अपवाद ठरला होता दिव्यातील तलाव हे मृत अवस्थेत होते तलावामध्ये संपूर्ण कचरा टाकण्यात येत होता. ड्रेनेजचे घाण पाणी तलावत जात होते या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी आवाज उठवला होता व प्रशासनाला धारेवरती धरले होते याची दखल घेऊन थातूरमातूर प्रमाणात दिवा तलावाचे साफसफाई करण्यात आली होती.परंतु उद्या गणपती बाप्पाचे आगमन असून दिव्यातील तलावात अस्वच्छता असून त्यात भरपूर प्रमाणात कचरा आहे या संदर्भात प्रदूषण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांना कळवल्यानंतर त्यांनी हे तलाव गणपती दहा दिवसाचे गेल्यानंतर हे तलाव साफ करण्यात येईल असे थातूरमातूर उत्तर देऊन आपली जबाबदारी ते झटकत आहे अशा बेजबाबदार अधिकारी मनीषा प्रधान यांच्यावर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे .
